इक्विटी मार्केट पडझड – हा काळही सरेल

Reading Time: 3 minutes जेव्हा सर्व काही आलबेल असते तेव्हा बरेच लोक हे विसरून जातात की शेअर बाजारात मुदत ठेवींप्रमाणे स्थिर दराने परतावा मिळणार नसतो, तर अनेक महिने, काही वेळा वर्षे  गुंतवणूक नुकसानीत दिसत राहू शकते. मात्र चांगले दिवस आले की थोड्याच अवधीत अशी गुंतवणूक नुकसानच भरून काढते असे नव्हे, तर वर नफाही करून देते. ‘गुंतवणूक’ हे मानवी मनातील भविष्याविषयी वाटणाऱ्या ‘आशा’ आणि ‘अनिश्चितता’ या दोन भावनांमधील द्वंद्व आहे