सरकारने सक्ती हटविली असली तरी पिक विमा हवाच !

Reading Time: 4 minutes २०१६ मध्ये सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेत भाग घेणे आता ऐच्छिक करण्यात आले असले तरी पिक विमा काढणे, आपल्या हिताचे आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. पिक विमा योजनेतूनच शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक स्थर्य मिळू शकते, त्यामुळे पिक विमा योजना अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सरकार करते आहे, हे स्वागतार्ह आहे.