Policybazaar.Com: पॉलिसी बाजार.कॉम कंपनीची थक्क करणारी यशोगाथा

Reading Time: 4 minutes जीवन विमा ही संकल्पना भारतात जगातील इतर देशांपेक्षा उशिराच आली. मागच्या काही वर्षात मात्र परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. विमा का गरजेचा आहे? हे आता लोकांना पटवून सांगावं लागत नाही. अचानक ओढवू शकणाऱ्या आजारपणातून बाहेर पडण्यासाठी आणि आपल्यानंतर आपल्या प्रियजनांची काळजी घेण्यासाठी विमा आवश्यक आहे हे आता एव्हाना सर्वांना तत्वतः पटलं आहे. असं असलं तरीही, आजही भारतात केवळ ३.६९% लोकांनी आपला विमा काढला आहे ही वस्तुस्थिती आहे. सरकारी विमा कंपन्यांचा एकसुरी कारभार, विमा प्रतिनिधींची मनमानी यामुळे सुद्धा काही लोक विम्यापासून लांब राहिले आहेत हे ही एक सत्य आहे.