Loan Rejection: कर्ज नामंजूर होण्याची ११ कारणे

Reading Time: 3 minutes आयुष्यात कुठल्या न कुठल्या कारणासाठी कर्ज घ्यावेच लागते, कर्ज घेताना अर्थातच काही अटी असतात ज्यांची पूर्तता करणे आवश्यक असते. कर्जासाठी अर्ज केल्यानंतरही कर्ज मिळेल की नाही याबाबतची भिती वाटते कारण बऱ्याचदा सगळी कागदपत्रे असूनही कर्ज नामंजूर होऊ शकते. कर्ज मंजूर होताना तुमच्या भूतकाळातील किंवा वर्तमानकाळातील अनेक घटकांचा विचार केला जातो. गोष्टी पडताळून पाहिल्या जातात. त्या कदाचित आपल्याला माहितही नसतात. 

सरकारच्या स्वस्त वैयक्तिक विमा योजना

Reading Time: 4 minutes वित्तीय नियोजनाची सुरुवात शुद्ध विम्यानेच झाली पाहिजे. कमवित्या व्यक्तीच्या मृत्यू पश्चात त्याचे कुटूंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याचा सर्वात स्वस्त मार्ग म्हणजे शुद्ध विमा खरेदी करणे.शुद्ध विम्याच्या कालावधीत विमा धारकाचा मृत्यू झाल्यास विमा संरक्षणाइतकी (Sum Insured) रक्कम विमा पॉलीसीत नामनिर्देशन असलेल्या वारसास (Nominee) देय असते. विमा पॉलीसीची मुदत संपल्यानंतर विमा धारक हयात राहिल्यास विमा कवच बंद होते. परिणामी कुठलीही रक्कम देय राहत नाही. शुद्ध विमा ही गुंतवणूक नसून एक खर्च आहे. विमा पॉलीसीची मुदत संपल्यावर कुठलाही दावा करता येत नाही, या कारणामुळे विमा खरेदी इच्छुक या प्रकारचा विमा खरेदी करण्यास उत्सुक नसतात.