माझी कन्या भाग्यश्री योजना

Reading Time: 4 minutes केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१४ पासून “बेटी बचाओ-बेटी पढाओ” ही योजनाही सुरु केली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार सदर योजनेसाठी मुलींचे जन्मदर कमी असणाऱ्या भारतातील १०० जिल्ह्यांची निवड करून सदर जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. “बेटी बचाओ-बेटी पढाओ” या योजनेच्या धर्तीवरच मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार निर्माण करणे, मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांना शिक्षण देणे व बालविवाहास प्रतीबंध करणे या उद्देशाने महाराष्ट्र राज्यसरकारने सध्या सुरु असलेली सुकन्या योजना विलीन करुन “माझी कन्या भाग्यश्री” ही नवीन योजना सुरु केली आहे.

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY)

Reading Time: 3 minutes अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत हे वाक्य आपण आयुष्यभर ऐकलेलं असतं. त्यातील निवारा म्हणजेच राहायला घर ही गोष्ट तर आपल्याला सर्व ऋतूंत तिन्ही त्रिकाळ वाचवणारी. शिवाय ते घर जर स्वतःचं असेल तर त्यातून मनाला मिळणाऱ्या आनंदाची गोष्टच वेगळी. मात्र सध्याच्या दिवसात स्वतःचं घर घेणं ही एक मोठी बाब आहे. वाढती महागाई, वाढत्या गरजा यांचा मेळ बसवत स्वतःचं घर खरेदी करणं म्हणजे आकाशाला गवसणी. स्वतःच घर म्हणजे जणू सामान्य लोकांना आवाक्याबाहेर वाटणारी गोष्ट .पण “प्रधानमंत्री आवास योजना” असताना सामान्य नागरिक स्वतःच्या घराचं स्वप्न नक्की पाहू शकतात.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना

Reading Time: 3 minutes या वर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पात असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी प्रस्तावित असलेली प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन (PM-SYM) योजना सुरू झालेली आहे. आपल्या पंतप्रधानानी या योजनेचे औपचारिक उद्घाटन १५  फेब्रुवारी २०१९ रोजी गांधीनगर येथे केले. या योजनेनुसार यातील लाभार्थीना ६० वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा 3000/- (रुपये तीन हजार) एवढे निश्चित निवृत्तीवेतन मिळेल. या योजनेच्या निवडक लाभार्थीना PM-SYM या पेन्शनकार्डचे वाटप करण्यात आले.