Reading Time: 3 minutes

अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत हे वाक्य आपण आयुष्यभर ऐकलेलं असतं. त्यातील निवारा म्हणजेच राहायला घर ही गोष्ट तर आपल्याला सर्व ऋतूंत तिन्ही त्रिकाळ वाचवणारी. शिवाय ते घर जर स्वतःचं असेल तर त्यातून मनाला मिळणाऱ्या आनंदाची गोष्टच वेगळी.

मात्र सध्याच्या दिवसात स्वतःचं घर घेणं ही एक मोठी बाब आहे. वाढती महागाई, वाढत्या गरजा यांचा मेळ बसवत स्वतःचं घर खरेदी करणं म्हणजे जणू आकाशाला गवसणी घालणं! स्वतःच घर म्हणजे सामान्य लोकांना आवाक्याबाहेर वाटणारी गोष्ट .

पण “प्रधानमंत्री आवास योजना” असताना सामान्य नागरिक स्वतःच्या घराचं स्वप्न नक्की पाहू शकतात.

काय आहे ही योजना? याचा कोणाला लाभ होतो?

  • ही भारत सरकारची सामान्य नागरिकांसाठीची एक योजना आहे. आपल्याला साधारणपणे असं वाटत असतं की सरकारी योजना म्हणजे गरिबांसाठी! पण चांगली गोष्ट म्हणजे ही योजना फक्त गरीब नाही तर आता मध्यमवर्गीय लोकांसाठी सुद्धा आहे. सरकारने प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण प्रमाणेच प्रधानमंत्री आवास योजना-शहरी सुद्धा सुरू केली आहे.

कोण असू शकतं लाभार्थी?

  • वय वर्षे २१ ते ५० यामधील नागरिक या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. ५० वर्षांपेक्षा जास्त वय असल्यास कर्ज घेताना कायदेशीर वारसाचे नाव सुद्धा जोडावे लागते.
  • नव्या नियमानुसार या योजनेतील कर्जासंबंधित मर्यादा ३ लाखपासून १८ लाख केली गेली आहे. समाजातील आर्थिक दुर्बल गट (EWS) बरोबरच कमी उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गट (MIG) यात सामाविष्ट होणाऱ्या नागरिकांनासुद्धा या योजनेचा लाभ होऊ शकतो.
    • EWS म्हणजे वार्षिक उत्पन्न ३ लाखापर्यंत
    • LIG म्हणजे वार्षिक उत्पन्न ३ ते ६ लाख
    • MIG म्हणजे वार्षिक उत्पन्न ६ ते १८ लाख 

      हे उत्पन्न अर्ज करणारी व्यक्ती व तिचे कुटुंब यांचे एकत्रित असले पाहिजे.

उत्पन्नाचे प्रमाण

  • या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या व्यक्तीला उत्पन्नाचे प्रमाण वा पुरावा सादर करावा लागतो.
  • प्रति महिना वेतन घेणाऱ्या व्यक्तीला वेतन प्रमाणपत्र (salary slip), फॉर्म १६ (Form 16), आयकर विवरण पत्र अर्जासोबत जोडावे लागते.
  •  स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीस,
    • वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास उत्पन्नाचे प्रतिज्ञापत्र
    • वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर उत्पन्नाचा दाखला वा योग्य पुरावा

         ही योग्य कागदपत्रे घेऊन व्यक्तीला बँक वा एखाद्या संस्थेकडे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृहकर्जासाठी अर्ज करता येतो.

योजनेचा मुख्य फायदा

  • या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या व्यक्तींना घरासाठी घेतल्या जाणाऱ्या कर्जाच्या व्याजावर सवलत (सबसिडी) मिळते.
    • वार्षिक उत्पन्न ३ते ६ लाखापर्यंत असेल तर ६ लाखापर्यंतच्या कर्जावर ६.५ % सवलत 
    • वार्षिक उत्पन्न ६ ते १२ लाख असेल तर ९ लाखापर्यंतच्या कर्जावर ४ % सवलत
    • वार्षिक उत्पन्न १२ ते १८ लाखापर्यंत असेल तर १२ लाखापर्यंतच्या कर्जावर ३% सवलत

          म्हणजे एकूण गृहकर्जपैकी वरीलप्रमाणे ठराविक (६ /९ /१२) लाखापर्यंतच्या कर्जावर जे व्याज होईल त्यात सवलत मिळते.

  • उदा. एखाद्याचे वार्षिक उत्पन्न ११ लाख आहे आणि त्याने ३० लाख रुपये गृहकर्जासाठी अर्ज केला असेल तर त्या ३० लाखापैकी ९ लाख रु.  कर्जावरील व्याजावर ४% सवलत दिली जाते व ती रक्कम कर्जाच्या रकमेतून वगळली जाते (उर्वरित २१ लाखांवर बँक वा त्या संस्थेच्या दराने वा बाजारभावाने व्याज आकारले जाते).
  • यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृहकर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला एकूण कर्ज परतावा करताना काही प्रमाणात दिलासा मिळतो.
  • या योजनेअंतर्गत गृहकर्जासाठी अर्ज करायचा असल्यास आवश्यक ती कागदपत्रे घेऊन संबंधित बँक वा संस्थेकडे जावे. त्यांच्याकडे या योजनेची सुविधा असेल तर तुमचा अर्ज परवानगीसाठी सेंट्रल नोडल एजन्सीकडे पाठवला जातो.
  • त्या एजन्सीकडून परवानगी मिळाली तर गृहकर्ज पारित होऊन तुमच्या सवलत वा सबसिडीची रक्कम सरळ तुमच्या कर्जखात्यामध्ये जमा होते आणि उर्वरित कर्ज रकमेवर तुम्हाला व्याज भरावे लागते.

प्रधानमंत्री आवास योजना ही सरकारच्या महत्वपूर्ण योजनांपैकी एक योजना आहे. या योजनेच्या मदतीने सर्वसामान्यांच्या आयुष्यातलं एक महत्वाचं पण काहीसं अवघड वाटणारं घराचं स्वप्न साकार होऊ शकतं.

काय आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना? , आयुष्मान भारत योजना नक्की आहे तरी काय?

सुकन्या समृद्धी योजना- नियम व वैशिष्ठ्ये ,  प्रधानमंत्री वय वंदन योजना (PMVVY)

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

मृत्युपत्र – मृत्युपत्र म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे?

Reading Time: 4 minutes मृत्युपत्र हा एक महत्वाचा पण बहुतांश वेळा गांभीर्याने घेतला न जाणारा विषय आहे. मृत्युपत्र हे बंधन अथवा जबाबदारी नसून तो आपला हक्क आहे. त्यामुळे या हक्काबद्दल जागरूक व्हा. मृत्युपत्र तयार केल्यामुळे तुमच्या मालमत्तेचं व कुटुंबाचं भविष्य सुरक्षित राहील. तसेच, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र बांधून ठेवण्याची ताकदही मृत्युपत्रामध्ये आहे.  

मर्यादित भागीदारी संस्था: नियम व वैशिष्ट्ये

Reading Time: 3 minutes व्यवसायाचे कर्ज व देणी वसूल करण्यासाठी भागीदाराच्या वैयक्तिक मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता असते. मर्यादित भागीदारी व्यवसायामुळे हे प्रश्न सुटू शकतात. डॉक्टर्स, सनदी लेखापाल, वास्तुविशारद, वकील, तांत्रिक सल्लागार, कर सल्लागार, वित्तीय सल्लागार यांना आपल्या ज्ञानाचा आणि सहकाऱ्याच्या ज्ञानाचा उपयोग करून मर्यादित भागीदारीमुळे (LLP) आपला व्यवसाय वाढवता येऊ शकेल. अशा प्रकारे मर्यादित भागीदारी असलेली भागीदारी स्थापन करता येणे सोपे आणि कमी खर्चाचे आहे.

लाभांश (Dividend) म्हणजे काय?

Reading Time: 3 minutes कंपनीने आपल्या करोत्तर नफ्यातून (Profit after taxes)  समभागधारकांना पैशाच्या स्वरूपात दिलेली भेट म्हणजे ‘लाभांश’ (Dividend) होय. कंपनी झालेला संपूर्ण फायदा वाटून टाकत नाही तर त्यातील काही भाग भागधारकांना देते. शिल्लक रक्कम भविष्यातील विस्तार योजना किंवा अधिक व्याजदराने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरून आपली नफाक्षमता वाढवते.