अर्थसंकल्प २०२१ हलवा सेरेमनी
https://bit.ly/39c7fj4
Reading Time: 3 minutes

अर्थसंकल्प २०२१: हलवा सेरेमनी

शनिवारी, 23 जानेवारी रोजी नवी दिल्लीतील उत्तर ब्लॉक येथील केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या मुख्यालयात सन २०२१ च्या अर्थसंकल्प प्रक्रियेतील अंतिम टप्पा म्हणजेच पारंपारिक ‘हलवा सेरेमनी’ आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, राज्यमंत्री अनुराग ठाकूर आणि अन्य काही उच्च अधिकारी या समारंभात सामील झाले होते. पारंपारिक हलवा सेरेमनी दरवर्षी सरकारच्या अर्थसंकल्पाच्या कागदपत्रांच्या छपाईची प्रक्रिया सुरू होण्याच्या निमित्ताने आजोयित केला जातो. परंतु, कोविड-१९ च्या पार्श्ववभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्प २०२१-२२ ‘पेपरलेस’ असणार आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच अर्थसंकल्प पेपरलेस स्वरूपात देण्यात येईल.

जानेवारी अखेरीस विशेषतः अर्थसाक्षर लोकांना ‘बजेट’चे वेध लागतात. बजेट संसदेत सादर झाल्यावर न्यूज चॅनल्सवर, सोशल मीडियावर सगळीकडे बजेटवर चर्चा सुरू होते. बजेटबद्दल सगळ्यांना आकर्षण असतं. परंतु हे बजेट तयार कसं होतं? कुठे तयार होतं? त्याची प्रक्रिया काय? हे मात्र बहुतेकांना माहिती नसते. ‘बजेट जन्माची’ ही माहिती फार रंजक आहे.

https://bit.ly/3a5dt3Q

अर्थसंकल्प २०२१: हलवा सेरेमनी म्हणजे काय?

  • अर्थसंकल्प म्हणजेच बजेट तयार होतं ते एका अत्यंत कडक सुरक्षा असलेल्या जागी. ती जागा  म्हणजे ‘नॉर्थ ब्लॉक’ येथील तळघर!
  • तिथे दहा दिवस अर्थमंत्री आणिअर्थसंकल्पाची टीम काम करत असते. कोणालाही बाहेरच्या जगाशी संबंध, संपर्क ठेवण्याची परवानगी नसते. स्वतःच्या कुटुंबियांशीदेखील बजेट टीमला कोणताच संपर्क करता येत नाही. ही सारी ‘खुफिया’ प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी एक समारंभ केला जातो. त्यास ‘हलवा सेरेमनी’ म्हणतात.
  • ही काही कोणती पूजा नाही, फक्त एक वारसा, परंपरा आहे. अर्थमंत्री या कार्यक्रमाचं  नेतृत्व करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बजेट टीमसाठी मोठ्या कढईत शिरा म्हणजे हलवा तयार केला जातो. तो सगळ्या टीमला खायला दिला जातो. त्यानंतर सर्वजण नॉर्थ ब्लॉकच्या तळघरात जातात आणि इथून त्यांचा बाह्यजगाशी संपूर्णपणे संबंध तुटतो.
  • कोणालाही मोबाईल फोन आतमध्ये नेता येत नाही. आतमध्ये फक्त इंटरकॉम प्रकारातील एक लँडलाईन फोन असतो, ज्यात फक्त ‘इनकमिंग’ कॉल्सची सुविधा असते. या फोनवर जेव्हा बजेटटीममधील सदस्य बोलतात त्यावेळी ‘इंटलीजन्स’ म्हणजे ‘गुप्तहेर खात्यातील’ माणूस तिथे हजर असतो.
  • आयबी (IB) म्हणजे इंटलीजन्स ब्युरोच्या देखरेखीखाली संपूर्ण सुरक्षा असते. कुठेही कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये यासाठी काळजी घेतली जाते. बजेट हे अत्यंत गुप्तपणे तयार केलं जातं.
  • नॉर्थब्लॉकच्या तळघरात प्रत्येक मेंबरला झोपण्यासाठी पलंग, काम करण्यासाठी टेबल दिलेलं असतं. खाण्याची सोयदेखील तिथेच केलेली असते. कोणालाही दहा दिवस बाहेर पडता येत नाही. फक्त अर्थमंत्री आणि मोठ्या हुद्द्यावरील काही मोजक्या अधिकाऱ्यांना अधूनमधून बाहेर पडता येतं. या तळघराला ‘बंकर’चं रूप आलेलं असतं. या तळघरात डॉक्टर व स्वयंपाकी असतात. आतमध्ये संपूर्ण सोयी असतात.
  • बजेट तयार झाल्यावर ते छापण्यापूर्वी तळघरातच ‘प्रूफ रिडर्स’ कडून ते नीट तपासलं जातं. व्याकरणातील चुका दुरुस्त केल्या जातात.
  • नॉर्थ ब्लॉकमध्येच प्रिंटिंग प्रेस असते. बजेट टीमने बजेट तयार केलं की त्या प्रिंटिंग प्रेसवर ते बजेट प्रिंट केलं जातं. दहा दिवसांनंतर ते छापलेलं भलंमोठं बजेट अत्यंत सुरक्षेमधून बाहेर आणलं जातं.
  • इंडियन आर्मीची, पोलिसांची कडक सुरक्षा असते. कडक सुरक्षेमधून ते संसदेत आणल्या जातं. फक्त दहा मिनिटांपूर्वी कॅबिनेट मंत्रिमंडळाला बजेटचं संक्षिप्त रूप दाखवलं जातं. बजेट हे ‘टॉप सिक्रेट डॉक्युमेंट’ म्हणून ओळखलं जातं.
  • बजेटसंदर्भात एवढी सुरक्षितता बाळगण्याचं कारण म्हणजे अर्थव्यवस्थेसंबंधित कोणतीही महत्वाची माहिती बाहेर जात कामा नये. तसे झाल्यास, अप्रत्यक्ष करासंबंधित माहिती बाहेर गेल्यास काही व्यापाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फायदा होऊ शकतो आणि एकप्रकारे इतर जनतेवर अन्याय होऊ शकतो.

यावर्षी मात्र  कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर छपाई प्रक्रिया टाळण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला. कारण छपाई प्रक्रियेचे काम करणाऱ्या लोकांना सुमारे पंधरा दिवस प्रेसवर रहावे लागते. अर्थसंकल्प सादर होईपर्यंत साधारणत: शंभरहून अधिक लोक नॉर्थ ब्लॉकच्या तळघरातच राहतात. त्यामुळे अर्थसंकल्प २०२१ प्रथमच पेपरलेस स्वरूपात असेल. दि. १ फेब्रुवारी २०२१ रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प २०२१-२२ सादर करतील. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Budget 2021 and Halwa Ceremony Marathi Mahiti, Budget 2021 -Halwa Ceremony in Marathi, Budget 2021 -Halwa Ceremony Marathi

Share this article on :
1 comment
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मृत्युपत्र – मृत्युपत्र म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे?

Reading Time: 4 minutes मृत्युपत्र हा एक महत्वाचा पण बहुतांश वेळा गांभीर्याने घेतला न जाणारा विषय आहे. मृत्युपत्र हे बंधन अथवा जबाबदारी नसून तो आपला हक्क आहे. त्यामुळे या हक्काबद्दल जागरूक व्हा. मृत्युपत्र तयार केल्यामुळे तुमच्या मालमत्तेचं व कुटुंबाचं भविष्य सुरक्षित राहील. तसेच, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र बांधून ठेवण्याची ताकदही मृत्युपत्रामध्ये आहे.  

मर्यादित भागीदारी संस्था: नियम व वैशिष्ट्ये

Reading Time: 3 minutes व्यवसायाचे कर्ज व देणी वसूल करण्यासाठी भागीदाराच्या वैयक्तिक मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता असते. मर्यादित भागीदारी व्यवसायामुळे हे प्रश्न सुटू शकतात. डॉक्टर्स, सनदी लेखापाल, वास्तुविशारद, वकील, तांत्रिक सल्लागार, कर सल्लागार, वित्तीय सल्लागार यांना आपल्या ज्ञानाचा आणि सहकाऱ्याच्या ज्ञानाचा उपयोग करून मर्यादित भागीदारीमुळे (LLP) आपला व्यवसाय वाढवता येऊ शकेल. अशा प्रकारे मर्यादित भागीदारी असलेली भागीदारी स्थापन करता येणे सोपे आणि कमी खर्चाचे आहे.

लाभांश (Dividend) म्हणजे काय?

Reading Time: 3 minutes कंपनीने आपल्या करोत्तर नफ्यातून (Profit after taxes)  समभागधारकांना पैशाच्या स्वरूपात दिलेली भेट म्हणजे ‘लाभांश’ (Dividend) होय. कंपनी झालेला संपूर्ण फायदा वाटून टाकत नाही तर त्यातील काही भाग भागधारकांना देते. शिल्लक रक्कम भविष्यातील विस्तार योजना किंवा अधिक व्याजदराने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरून आपली नफाक्षमता वाढवते.

सर्व नोटा परत आल्या तरी नोटबंदी यशस्वीच का आहे?

Reading Time: 3 minutes सरकारने रद्द केलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या १०० टक्के नोटा परत आल्या तरी नोटबंदी यशस्वी झाली, कारण त्यावर आता कर भरला गेला आणि आता ती एका जागी पडलेली रक्कम बँकेत येवून प्रवाही झाली. नोटबंदीपूर्वीची वाढ ही “रोगट सूज” होती, ती जाऊन देश सशक्त होतो आहे आणि दमदार वाटचालीला सज्ज होतो आहे, हे आता अधिक महत्वाचे !