Reading Time: 3 minutes

नोकरी करून लवकर निवृत्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नसते. जीवन जगत असताना आर्थिक स्वातंत्र्याचा आनंद घेणे गरजेचे असते. खालील लेखात आर्थिक प्रगतीच्या ९ पायऱ्या दिल्या असून जीवनाच्या वेगवेगळ्या टप्यावर त्यांना समजून घेऊन कृतीत आणणे गरजेचे आहे. 

वयाच्या २० आणि ३० च्या टप्यात असताना खालील गोष्टी करा –

१. महिन्याच्या पगाराचे योग्य नियोजन करा 

  • तुम्हाला लवकर नोकरी मिळाली म्हणजे पगार कसाही खर्च करावा असा अर्थ होत नाही. एखाद्या व्यक्तीचा महिन्याच्या शेवटी येणाऱ्या पगारावर शैक्षणिक कर्ज किंवा इतर खर्चासाठी पैसे लागू शकतात. महिन्याच्या पगाराचे योग्य नियोजन करणे गरजेचे असते. 
  • पण तुम्ही काही दिवसांनी अशा टप्यावर जाऊन पोहोचता की तुमच्या पगारात वाढ झालेली असते. तेव्हा तुम्ही मूलभूत गरजा सोडून इतर चैनीच्या गोष्टींसाठी  पैसे खर्च करू शकता. फक्त किती पैशांची बचत करायची हे टप्याटप्याने ठरवायला हवे. 

२. त्रासदायक नोकरी सोडून नवीन कौशल्य शिकणे 

  • जेव्हा तुम्ही नोकरी सोडल्यावरसुद्धा दररोजचे खर्च भागवू शकता तेव्हा त्रासदायक असणारी नोकरी सोडण्याचे स्वातंत्र्य तुमच्याजवळ असते. पण यासाठी आपत्कालीन निधीची बचत करायला हवी. 
  • आपत्कालीन बचत निधीची गरज अडचणीच्या वेळेला लागू शकते. त्यामुळे त्याचे व्यवस्थापन नोकरी असतानाच करायला हवे. जास्त मागणी असलेली कौशल्य शिकण्यासाठी बचतीचा उपयोग करावा. त्यामधील गुंतवणूक फायदेशीर ठरते. 

३. नवीन करिअर पर्यायांमधून स्वतःचा व्यवसाय सुरु करणे 

  • तुम्ही आपत्कालीन निधीमध्ये बचत केली की वेगळ्या करिअर पर्यायाकडे पाहायला हरकत नसते. वेगळे करिअरचे पर्याय माहित करून घेणे गरजेचे आहे. या वेळी पैशांची बचत जवळ असणे आवश्यक असते. 
  • या काळात काटकसरीने पैशांची बचत केली तर तुम्हाला योग्य पर्याय मिळू शकतो. यावेळी जीवनशैलीवरील खर्च कमी केले तर पैशांची बचत होऊ शकते. 

४. तुम्ही एक किंवा दोन वर्ष सुट्टी घेऊन तुमच्या कलेसाठी वेळ देऊ शकता. 

  • तुम्ही जास्त काळासाठी सुट्टी घेतली तर त्याकाळात पैशांच्या नियोजनाची चिंता न करता स्वतःच्या आवडीनिवडी जपायला हव्यात. या काळात तुम्ही तुमच्या कलेसाठी वेळ देऊ शकता. 
  • तुम्ही स्वतःच्या आवडींना प्राधान्य देताना वेगवेगळ्या ठिकाणी फिरू शकता. नवीन उद्योग चालू करायचा असेल तर त्यासाठी प्रयत्न करू शकता. या काळात तुम्ही स्वतः आर्थिक स्वातंत्र्य मिळवलेले असते. 

नक्की वाचा : आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी फॉलो करा या टिप्स 

तुमच्या ४०,५० च्या वयात असताना खालील गोष्टी करा. 

५. कर्जमुक्त होणे 

  • आयुष्यात ४०,५० च्या  वयात असताना तुमच्यावर असलेले कर्ज पूर्ण फेडून कर्जाच्या जाळ्यातून मुक्त व्हायला हवे. तुम्ही राहत असलेल्या घर कर्जमुक्त असायला हवे. 
  • तुम्ही कर्जमुक्त होणे ४०,५० च्या वयात गरजेचे असते. कर्जाच्या जाळ्यातून मुक्त झाल्यानंतर या वयात मालमत्तेवर फक्त तुमचा हक्क राहतो. 

६. तुम्ही सेवानिवृत्त होण्याच्या आधी पैशांचे योग्य नियोजन करणे 

  • नोकरीतून सेवानिवृत्त होण्याची तारीख जवळ आलेली असताना पैशांचे नियोजन करणे गरजेचे असते. निवृत्त झाल्यानंतरच्या तारखेनंतर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत बदल न करता पैशांची बचत व्हायला हवी. 
  • सेवानिवृत्त होण्यापूर्वी पैशांची गुंतवणूक केलेली असल्यास चिंता करण्याची गरज नाही. तुमच्याकडे सध्या असलेली गुंतवणूक आणि त्यामधून मिळणारा परतावा तुम्हाला योग्य रक्कम मिळवून देईल. 

७. तुम्ही पैशांची बचत करून कमी पगाराच्या नोकरीत समाधानाने जगू शकता 

  • सेवानिवृत्त होण्याच्या आधी तुम्ही पैशांची गुंतवणूक करून त्यातून योग्य परतावा मिळाला तर तुम्हाला आता पैसे बचत करून गुंतवणूक करण्याची गरज लागणार नाही. तेव्हा फक्त तुम्हाला पैसे कमवून तुमची जीवनशैली जपण्याची गरज असते.
  • यामुळे तुम्हाला कमी पगाराची नोकरी करताना स्वतःसाठी वेळ काढायला जमेल. हे करणे अनेक लोकांना सहज शक्य आहे पण ते हे करण्यासाठीचा त्रास करून घेत नाहीत. 

८. नोकरी सोडण्यापूर्वी आपत्कालीन निधीची बचत करणे 

  • तुम्ही नियमित पगाराची नोकरी सोडली तर पुढे कसे होईल ही चिंता सतावत असते. पण नोकरी करत असताना पैशांची बचत करून गुंतवणूक केलेली असल्यास तुम्हाला चिंता करण्याची गरज भासणार नाही.
  • तुम्ही नोकरी करत असताना केलेल्या गुंतवणुकीमधून आयुष्यभर लागणाऱ्या खर्चाची चिंता मिटू शकते. 

९. नोकरीत असताना केलेली योग्य गुंतवणूक गरजेच्या वेळी कामाला येते

  • तुम्ही नोकरी सोडल्यानंतर आधी केलेल्या गुंतवणुकीमधून आवडीच्या गोष्टीना वेळ देऊ शकता. त्यामध्ये फिरणे, सामाजिक कार्य आणि इतर गोष्टींचा समावेश होतो. 
  • आयुष्यात एका क्षणी या टप्यामध्ये आपण कोठे आहोत हे तपासून पाहणे गरजेचे असते. आयुष्यात तुम्ही एखादे ध्येय ठरवले आणि ते गाठले तर त्याचा आनंद साजरा करा. पण त्यानंतर परत एक नवे ध्येय ठरवणे गरजेचे असते. 

नक्की वाचा : निवृत्तीनंतरही आर्थिक स्वातंत्र्य देणारीच फायर मुव्हमेंट

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…