“व्हॅलेन्टाईन डे”नंतरचे आर्थिक नियोजन 

Reading Time: 3 minutes Loves me … Loves me not…. च्या चक्रातून संत व्हॅलेंटाईनच्या आशीर्वादाने बाहेर पडलेले आणि आपलं ‘रिलेशनशिप स्टेटस’ बदलायच्या विचारात असणारे तरुण तरुणी सध्या स्वप्नांच्या दुनियेत वावरत असतील. प्रेमात पडल्यावर सारं जग गुलाबी सुंदर वाटू लागतं. परंतु प्रत्यक्षात जेव्हा ‘कमिटमेंट’ची किंवा लग्नाची वेळ येते, तेव्हा मात्र वास्तवाचा लालभडक रंग समोर येतो. जबाबदारी हा शब्दच आजच्या तरुण पिढीला अवघड आणि अवजड वाटतो. पण विवाहपूर्व आर्थिक नियोजन केल्यास जबाबदारी हा शब्दही गोड वाटू लागेल.

केबल चॅनेल निवड आणि ग्राहकांचा संभ्रम

Reading Time: 3 minutes कशी करायची चॅनेल निवड? निवडीचे स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय?  या बदललेल्या नियमांमुळे नक्की काय साध्य होणार आहे? गेले कित्येक दिवस प्रत्येक चॅनेल आपआपल्या चॅनेल पॅकची जाहिरात करत आहे. आपलीच चॅनेल्स कशी  उत्तम आणि स्वस्त आहेत हे पटवून देण्याचा आटापिटा जरी चॅनेल्सकडून होत असला तरी प्रत्यक्ष चॅनेल निवडीबाबत मात्र  ग्राहकांच्या मनात अनेक संभ्रम आहेत. याचं कारण म्हणजे डीटीएच सेवा देणाऱ्या कंपन्यांची याबाबत असलेली उदासीनता. या उदासीनतेचे कारण काहीही असलं तरी त्याचा भुर्दंड मात्र ग्राहक चुकवत आहेत. कंपन्यांच्या हेल्पलाईनवर योग्य ती माहिती उपलब्ध नसणं, ग्राहक सेवा कर्मचाऱ्यांना त्याबद्दल माहिती नसणं इथपासून ते अगदी हेल्पलाईन नंबरवर संपर्क न होऊन टीव्ही चॅनेल्स दिसणं आपोआप बंद होणे अशा अनेक प्रकारचे त्रास ग्राहक सध्या सहन करत आहेत.

टीव्ही चॅनेल्स निवडीचा पर्याय आणि ट्रायचे नवीन नियम

Reading Time: 3 minutes ट्रायच्या नव्या नियमांमुळे ग्राहक सध्या गोंधळात आहे. नक्की काय करायचं? कोणतं पॅकेज निवडायचं? या साऱ्याबद्दल मनात अनेक प्रश्न आहेत. पण हळूहळू गोष्टी आणखी स्पष्ट होतील. निवडणूकीच्या काळात प्रजा अगदी राजा असते तसंच सध्या टेलिकॉम सुविधांच्या बाबतीत ‘ग्राहकसुद्धा राजा आहे’ असं म्हणायला हरकत नाही.

निवृत्ती नियोजन: निवृत्ती नियोजनाची ११ महत्वाची कारणे

Reading Time: 3 minutes भारतातील ४७% लोक त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर च्या भविष्यासाठी बचत करण्यास सुरुवातच करत नाहीत किंवा केली तरी त्यांना बचत करताना अडचणी येतात. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते. सेवानिवृत्ती नंतरच्या भविष्याची काय स्वप्न तुम्ही रंगवता? गोव्यात एका सुंदर पोर्तुगीज शैलीच्या बंगला, ज्याचा अर्धा भाग कॅफे हाउसमध्ये रुपांतरीत केला आहे तिथे पुस्तकांचा संग्रह आहे आणि लज्जतदार पदार्थ तिथे मिळतात? हे माझे निवृत्ती चे स्वप्न आहे. मग तुमचे काय आहे?

Retirement Planning: निवृत्ती नियोजनाची ११ महत्वाची कारणे – भाग १

Reading Time: 3 minutes एचएसबीसी ने केलेल्या विस्तृत जागतिक संशोधनावर मी अभ्यास करत होते, विषय होता, सेवानिवृत्तीचे भविष्य! त्यांनी भारतासह १७ देशांमधील १८,००० हून अधिक लोकांना सेवानिवृत्ती योजनेशी संबंधित माहिती विचारून सर्वेक्षणाचा आढावा घेतला. मिळालेला परिणाम मी स्वतः एक धोक्याची घंटा म्हणून पाहते. बहुतेक लोकांना निवृत्ती नियोजन किती महत्वाचे आहे, हे कळतच नाही. भारतातील ४७% लोक त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर च्या भविष्यासाठी बचत करण्यास सुरुवातच  करत नाहीत किंवा केली तरी त्यांना बचत करताना अडचणी येतात.

बँकेच्या वैशिष्टयपूर्ण सवलतींची आपणास माहिती आहे का?

Reading Time: 3 minutes कोणतीही सेवा-सुविधा समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचायला हवी, हे सामाजिक न्यायाचे महत्त्वाचे तत्व आहे. यामध्ये आर्थिक व्यवहारांची सुलभता हा ग्राहक म्हणून आपला हक्क आहे. अनेकदा असे होतं की खास ग्राहकांसाठी काय सोई सुविधा आहेत हेच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. ज्यांनी त्या दिल्या पाहिजेत त्यांना त्यात विशेष स्वारस्य अथवा जबाबदारीची जाणीव नाही. बँकिंग व्यवहार करताना अशा कोणत्या सोई सवलती खास ग्राहकांना उपलब्ध आहेत याची माहिती घेऊयात.

घरघुती अर्थसंकल्प आणि त्याची तयारी भाग १

Reading Time: 3 minutes योग्य प्लॅनिंन केल्यास अर्धे काम तिथेच यशस्वी होतं म्हणतात. आपण सहलींचं, सिनेमाला जाण्याचं प्लॅनिंग, बजेट तयार  करतो. अतिमहत्वाचं जे फॅमिली प्लॅनिंग ते सुद्धा करतो. पण एक अत्यंत महत्वाच्या अश्या गोष्टीचं प्लॅनिंग किंवा बजेट तयार करताना बरेचदा कंटाळा करतो ते घरघुती मासिक बजेटचं.

अर्थसाक्षरतेचं एक वर्ष..!

Reading Time: 2 minutes अर्थ!!! सामान्य माणसापासून ते अगदी जागतिक महासत्तेपर्यंत सगळ्यांसाठीच आवशयक असणारा असा हा घटक. अर्थार्जन हा जगण्यासाठी आवश्यक असणारा मूलभूत घटक आहे. आपण कमावलेल्या पैशाचे योग्य नियोजन व विनियोग करणे खूप आवश्यक आहे. यासाठी गरज असते ती अर्थसाक्षरतेची!

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे काय?

Reading Time: 3 minutes घटनेच्या ११२ व्या कलमानुसार देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. अलीकडील सर्व अर्थसंकल्प हे तुटीचेच आहेत आणि ही तूट नियंत्रणात ठेवणे हे सरकारपुढील मोठे आव्हान आहे.

सिम स्वॅप फ्रॅाड – सुरक्षिततेचे उपाय

Reading Time: 3 minutes तुमचं सिम कार्ड (मोबाईलक्रमांक) तुमच्या बँकेच्या खात्याइतकच महत्वाचं आहे. त्यामुळे सिम कार्ड सोबत घडणारी कोणतीही विचित्र घटना दुर्लक्षित करू नका. कारणयामध्ये कदाचित तुमचं बँक अकाउंट हॅक होण्याचीही शक्यता आहे. हे होऊ नये म्हणूनच सावध रहा.