Reading Time: 3 minutes

Budget: अर्थसंकल्पाचा  इतिहास

अर्थसंकल्पाचा (Budget) इतिहास तसा फार जुना नाही. मुळात ‘बजेट’ ही संकल्पना ब्रिटिशांची आहे. ‘बजेट’ हा शब्द अर्थशास्त्राशी निगडित असल्यामुळे असेल बहुदा पण हा शब्द काहीसा क्लिष्ट वाटतो. पण या क्लिष्ट शब्दाचा इतिहास मात्र काहीसा रंजक आहे. 

हे नक्की वाचा: अर्थसंकल्प २०२१: हलवा सेरेमनी नक्की कशासाठी साजरा करतात?

Budget: अर्थसंकल्पाचा (बजेटचा) इतिहास

  • बजेट हा शब्द मुळात अस्तित्वातच नव्हता. हा शब्द बॉगेट (bowgette) या शब्दाचा अपभ्रंश आहे. सन १७३३ मध्ये ब्रिटनमध्ये अर्थमंत्री रॉबर्ट वॉलपोल यांनी ‘लेदर बॅग’ घेऊन अर्थसंकल्प सादर करायला सुरूवात केली. लेदर बॅगेला फ्रेंच भाषेत ‘बोजोट’ किंवा ‘बुगेट’ असं म्हटलं जातं, त्यावरून पुढे ‘बजेट’ शब्दाचा उगम झाला. पुढे  देशाचा आर्थिक लेखाजोखा मांडण्याच्या प्रक्रियेला ‘बजेट’ हेच नाव दिलं गेलं. 
  • बजेट या शब्दाला मराठीमध्ये अर्थसंकल्प असं म्हणतात. अर्थसंकल्पाची कागदपत्रे आणण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन सुटकेस वापरली जाते. ही बॅग नेहमी लाल रंगाच्या शेडमधली असते. 
आर के षण्मुखम चेट्टी
  • अर्थमंत्री आर के षण्मुखम चेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला अंतरिम अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी संसदेत सादर केला होता. हा अर्थसंकल्प जी. डी. बिर्ला, आर. जे. टाटा व जॉन मथाई या तिघांनी मिळून, १९४४ च्या ‘बाँबे प्लॅन’च्या धर्तीवर तयार केला होता. परंतु हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे यामध्ये फक्त देशाच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता. यामध्ये कोणत्याही प्रकारचे आर्थिक धोरण मांडण्यात आले नव्हते.
  • त्यानंतर सन १९५५-५६ मध्ये रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर आणि तत्कालीन अर्थमंत्री चिंतामण देशमुख (सी.डी.) यांनी प्रथमच हिंदीमधून अर्थसंकल्प सादर केला.
  • त्यांनतरचे अर्थमंत्री टी.टी. कृष्णाम्मचारी यांनी अर्थसंकल्पात कर संकल्पनेला म्हणजेच कराद्वारे सरकार दरबारी पैसा जमा करण्यावर भर दिला. देशमुखांनी अर्थसंकल्पात दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यावेळच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून कराद्वारे पैसा उभा करणे हे खूप गरजेचे होते. त्यामुळे कृष्णाम्मचारी यांनी ‘कर’ या मुद्द्यावर भर दिला. 
  • त्यांनतर भारतीय अर्थविश्वात एक आगळीच घटना घडली. त्यावेळचे पंतप्रधान पंडित नेहरू व कृष्णाम्मचारी यांच्यामध्ये मतभेद झाल्यामुळे कृष्णाम्मचारी यांनी राजीनामा दिला. त्यामुळे सन १९५८-५९ चा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी नाही तर पंतप्रधानांनी म्हणजेच पंडित नेहरू यांनी सादर केला आणि अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करण्याच्या प्रथेला पहिल्यांदा छेद दिला गेला.
  • त्यानंतर काही वर्षांनी कृष्णाम्मचारी पुन्हा एकदा अर्थमंत्री झाले. त्यांच्या पहिल्या अर्थसंकल्पाच्या वेळी त्यांनी कररचनेला महत्व दिलं होतं. तर दुसऱ्यावेळी, “स्वेच्छेने संपत्ती जाहीर करण्याची योजना आणली.” त्यामुळे जनतेने मोठ्या प्रमाणावर आपली छुपी संपत्ती जाहीर केली.
  • सर्वात जास्त अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावे आहे. त्यांनी एकूण दहा अर्थसंकल्प सादर केले आहेत. यामध्ये दोन अंतरिम तर आठ वार्षिक अर्थसंकल्पाचा समावेश आहे. 
टी.टी. कृष्णाम्मचारी

Budget: बदलती अर्थव्यवस्था आणि अर्थसंकल्प 

  • बदलत्या अर्थव्यवस्थेनुसार अर्थसंकल्पातही वेगवेगळ्या गोष्टींचा विचार केला जाऊ लागला. सुरवातीच्या काळात फक्त कृषी क्षेत्राचा विचार करून अर्थसंकल्प तयार करण्यात आले होते.
  • हळूहळू बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार कर, उद्योग, बचत, महागाई दर यासारख्या गोष्टींवरही अर्थसंकल्पामध्ये भर देण्यात आला.
  • गेल्या दहा पंधरा वर्षांपासून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लक्षणीय बदल होत गेले आहेत. सुरवातीला फक्त कृषी क्षेत्राचा विचार करून बनविण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आज जागतिक घडामोडींचा विचार करून विविध योजना राबविण्यात येत आहेत. एक आदर्श जागतिक अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने देश आगेकूच करत आहे. 

(फोटो सौजन्य: गूगल इमेज)

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: History of Budget Marathi, History of Budget in Marathi, Budget History Marathi Mahiti, Budget History in Marathi, History of Indian Budget Marathi

Share this article on :
You May Also Like

Family Budget: घरगुती अर्थसंकल्पाच्या ८ महत्वाच्या स्टेप्स

Reading Time: 3 minutes पहिल्याच दिवशी जे व्यायामशाळेत अति व्यायाम करतात ते आठवड्याहुन जास्त व्यायामशाळेचा उंबरठा ओलांडत नाही. आपल्या वैयक्तिक, घरघुती अंदाजपत्रकाचंही तसंच आहे. खूप डोकं लावून जटिल, किचकट बजेट तयार केलं तर ते पाळल्या जाणार नाही. सुरवातीचा उत्साह नव्याचा नऊ दिवस म्हणून उडून जाईल. यामुळे साधा सरळ अर्थसंकल्प तयार करणेच योग्य असतं. असा अर्थसंकल्प पाळणेही सोपी असतं.

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 महत्वपूर्ण तरतुदी

Reading Time: 4 minutes अर्थसंकल्प म्हणजे नवीन वर्षाच्या काळात सरकारच्या तिजोरीत प्रामुख्याने कररूपाने पडणारी भर आणि…

विवाहानंतरचे आर्थिक नियोजन

Reading Time: 3 minutes विवाह ही व्यक्तीच्या जीवनातील महत्वाची घटना असून त्यामुळे व्यक्तीचे आर्थिक नियोजन हे वैयक्तिक न रहाता ते त्याच्या कुटूंबाचे आर्थिक नियोजन होते. यात साधारणपणे २० ते ३५ या वयोगटातील व्यक्तींचा सामावेश होतो. जरी आर्थिक नियोजन हे या वयोगटास सारखे असेल तरी तरी एक व्यक्ती म्हणून चुकून एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले असेल तरी विवाहामुळे भविष्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन अधिक जागरूक राहणे जरुरीचे आहे. या दृष्टीने या घटनेकडे पाहून सहज सुचलेल्या काही गोष्टी:

Income Tax – जुनं ते सोनं , मग नवीन ते काय ?

Reading Time: 2 minutes अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2023-24 सादर केला. नवीन करप्रणाली मध्ये अनेक…