आर्थिक सल्ला न लगे मजला…

Reading Time: 4 minutes बचत अथवा गुंतवणूकीचे पर्याय निवडतांना आपण कुठले निकष लावत असतो? त्यापूर्वी आपली अर्थ-मानसिकता काय आहे, याची पुरेशी कल्पना आपल्याला असते का? गुंतवणूकीचा हवाला कुणावर असतो? स्वतःवर, नशिबावर, देवावर कि सल्लागारावर? गुंतवणूकीतून नेमकं मला काय हवंय? हे ठरवणारे कोण असतं? अशा प्रश्नांची भली मोठी यादी तयार होईल.

आपल्या पीएफ अकाऊंट संबंधित तक्रार कशी दाखल कराल?

Reading Time: 3 minutes भविष्य निधी (पीएफ) किंवा कर्मचारी भविष्य निधि (ईपीएफ) ही सेवानिवृत्ती लाभ योजना आहे. ही गुंतवणूक योजना कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीसाठी बचत करण्यास प्रोत्साहित करते आणि या योजनेचा मूळ उद्देश सेवानिवृत्ती निधीची तरतूद हा आहे. ईपीएफ खात्याच्या दिशेने, कर्मचारी आणि नियोक्ता एकत्रितपणे १२% योगदान देतात. प्रत्येक कर्मचाऱ्यास सेवानिवृत्तीच्यावेळी ईपीएफ रक्कम व्याजासहित परत मिळते. ईपीएफ व्याजदर हा सतत बदलत असतो. सध्याचा व्याजदर ८.६५% आहे.

Moneycontrol – नव्या रूपातील गुंतवणूकदारांचा मितवा

Reading Time: 4 minutes एक गुंतवणूकदार म्हणून आपल्या गुंतवणुकीवर आपले लक्ष हवे. त्याची अधिकृत माहिती मिळवण्याचे पुस्तके, अहवाल, संकेतस्थळे, मोबाईल अँप यासारखे अनेक मार्ग आहेत. त्यापैकी  Moneycontrol हे सर्व उपयुक्त माहितीचे सर्वसमावेशक अँप आहे. हे अँप म्हणजे गुंतवणूकदारांचा मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या अशा अर्थाने ‘मितवा’ आहे असे मी म्हणतो. या अँपमध्ये  अनेक उपयोगी गोष्टी असून ते पूर्ण क्षमतेने वापरले तर अन्य कोणत्याही माहितीची गरज पडणार नाही. अनेकांना हे अँप शेअर, म्युच्युअल फंड युनिटचे भाव पाहण्याचे आहे असे वाटते. यापलिकडे त्याचा कसा वापर करावा याची माहितीच नसते. अलीकडेच या अँपने आपला चेहरा मोहरा बदलल्याने थोडा गोंधळ होण्याची शक्यता आहे. तेव्हा थोडक्यात या अँपचा कसा उपयोग होऊ शकतो ते जाणून घेऊयात.

आधार कार्डवरील फोटो कसा अपडेट कराल?

Reading Time: 2 minutes आधार कार्ड साठी आधार केंद्रावर काढलेले फोटो विनोदाचा विषय बनले आहेत. लहान मूलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच फोटो काहीतरी विचित्र आल्याची चर्चा सुरु झाली. सगळ्यांना आपापल्या प्रतिमेची काळजी असतेच. तुमच्या फोटोवर जोक होऊ नयेत असे वाटत असेल तर हे वाचा.

आयुर्विम्याबाबतचे १२ गैरसमज

Reading Time: 5 minutes वैयक्तिक आर्थिक नियोजनात आयुर्विमा हा विषय महत्त्वाचा असूनही त्याकडे पुरेसं लक्ष दिलं जात नाही. आयुर्विम्याचा संबंध मृत्यूशी असल्यामुळे त्यावर मोकळेपणाने चर्चा होत नाही. त्यामुळेच अनेक चुकीचे समज निर्माण होऊन पसरत राहतात. त्यात विमाविक्रेत्यांनी पिढ्यानपिढ्या वापरलेल्या चुकीच्या मार्गांमुळे भरच पडते.

अर्थसाक्षरचा महाराष्ट्र दिन!!

Reading Time: 2 minutes आज १ मे! आजचा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर आजचा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.  पुलंच्या विनोदी साहित्यापासून गदीमांच्या कवितांपर्यंत,रत्नाकर मतकरींच्या गुढकथा असोत वा बहिणाबाईंच्या कविता साहित्याने श्रीमंत असणारा महाराष्ट्र आजच्या आधुनिक डिजिटल युगातही तितक्याच ताकदीने उभा आहे.

बँकिंग, बँक मनी आणि वाढते वैयक्तिक कर्ज

Reading Time: 4 minutes वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण यावर्षी वाढले असून ते बुडविणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे, असा एक अभ्यास नुकताच प्रसिद्ध झाला आहे. देशातील बँकमनी वाढला असून त्यातून बँकिंगचे फायदे घेणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढते आहे, असा हा निष्कर्ष सांगतो. सुदृढ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हा बदल महत्वाचा आहे.

अमित शहा, राहुल गांधी आणि  अमिताभ बच्चन यांच्यातील साम्य !

Reading Time: 3 minutes भांडवली बाजारावर आधारित अर्थकारण जगाने स्वीकारले आणि ते भारतालाही स्वीकारावे लागले. पारदर्शी आर्थिक व्यवहार आणि संपत्ती वितरणाचा तो एक मार्ग आज मानला जातो. अपारदर्शी आणि अचल अशा जमीन आणि सोन्यातील गुंतवणूक कमी करून आपल्या राजकीय नेत्यांनी गुंतवणुकीचा जो नवा मार्ग निवडला आहे, तो त्यांच्या तर हिताचा आहेच, पण तो देशाच्याही हिताचा आहे.

आपल्या आधार कार्डचा गैरवापर कसा शोधाल?

Reading Time: 2 minutes आपलं आधार कार्ड भारतातील एक महत्वाचे ओळखपत्र आहे. १२ अंकी युनिक ओळख नंबर (Unique Identification Number) असलेल्या आपल्या आधार कार्डास आपला मोबाइल नंबर, पॅन आणि बँक खात्यास जोडणे अनिवार्य करण्याचा निर्णय आला आणि देशात ‘राईट टू प्राईवसी’चं वादळ उठलं. आपली सर्व माहिती धोक्यात आहे आणि त्याचा गैरवापर होऊ शकतो, या भावनेने काहीसं असुरक्षिततेचं  वातावरण निर्माण झालं. आता तुमच्या आधार कार्डचा कुठे गैरवापर होतोय का? हे तुम्ही तपासू शकता.

काटकसरीचे कानमंत्र भाग २

Reading Time: 3 minutes प्रत्येक श्रीमंत व्यक्तीचा काटकसरीच्या मार्गानेच धनोढ्य झाला आहे असे नाही. वेगवेगळ्या अनैतिक मार्गांनीदेखील संपत्ती मिळवता येते, पण ही श्रीमंती क्षणिक असते. ज्या गतीने पैसा येतो त्याच गतीने पैसा जातो देखील. सावकाश येंणारी श्रीमंती मात्र काटकसरीच्या सवयीने येते आणि दीर्घकाळ टिकते. जास्त पैसा असणे म्हणजे जास्त खर्च करणे या पेक्षा जास्त बचत करणे असे समीकरण असेल तर ती श्रीमंती टिकते. नाहीतर पत्त्याचा बंगला कोसळावा तशी सर्व संपती क्षणात नाहीशी होते. आपली श्रीमंती टिकवण्यासाठी श्रीमंत काही सवयी अंगी बाळगतात ज्यांना अंगीकार सगळ्यांनीच करायला काही हरकत नाही.