Reading Time: 2 minutes

सन १९४७ साली भारत आणि पाकिस्तान नावाचे दोन स्वतंत्र देश निर्माण झाले. पण एक देश आज जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थसत्ता बनण्याच्या मार्गावर आहे तर, दुसरा आतंकवादाचा अड्डा झाला आहे. या दोन देशांमध्ये तुलना होऊच शकत नाही. 

अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य असणाऱ्या महाराष्ट्राचा जीडीपी (GDP) पाकिस्तानपेक्षा जास्त आहे. खाली दिलेल्या १५ महत्वपूर्ण आकडेवारीवरून पाकिस्तानची भारताशी बरोबरी तर दूरच साधी तुलनाही होणं शक्य नाही. 

१. जीडीपी २०१७ ( Gross Domestic Product- 2017)-

भारत :  २.६ लाख कोटी  डॉलर्स  

पाकिस्तान : ३०४९५.१८  कोटी डॉलर्स 

सध्या भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. तर, पाकिस्तानची अर्थव्यवस्था १५४ व्या क्रमांकावर आहे. आकड्यांमधली तफावत बघता पाकिस्तानने भारताशी बरोबरी करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते शक्य नाही. भारताचा दरडोई जीडीपी (Per Capita GDP) १९३९.६१ डॉलर असून पाकिस्तानचा १७४५.८५ डॉलर आहे. 

२. परकीय चलन साठा (Foreign Exchange Reserves) –

भारत: ४५४४७० मिलियन डॉलर

पाकिस्तान: ११४८९मिलियन डॉलर 

परकीय चलन साठा म्हणजे देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे (RBI) जमा असलेले परकीय चलन. परकीय चलन परकीय चलन साठा परकीय कर्ज परतफेड करण्याची देशाची क्षमता दर्शवते. सर्वात जास्त परकीय चलन साठा असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारताचा ७ व्या तर, पाकिस्तान यामध्ये ७३ व्या क्रमांकावर आहे. 

३. परदेशी कर्ज (Foreign debt) –

भारत: ५२९.७ अब्ज डॉलर्स

पाकिस्तान: रु. २९.८६१ ट्रिलिअन 

दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कर्जामुळे नखशिखान्त कर्जात बुडालेला पाकिस्तान, डोक्यावरचा कर्जाचा डोंगर उतरवायला सक्षम आहे असं वाटत नाही. कमी फॉरेन एक्स्चेंज रिझर्व्ह असणारा पाकिस्तान दिवाळखोरीच्या दिशेने वाटचाल करत आहे, असंच चित्र सध्या दिसत आहे.

४. दरडोई उत्पन्न २०१८ (Per Capita Income 2018)-

भारत: रु. १,१२,८३५ प्रतिवर्ष

पाकिस्तान: रु. १,८०,२०४ प्रतिवर्ष

दरडोई उत्पन्नाच्या पाकिस्तान आघाडीवर असले तरी, भारताच्या लोकसंख्येचा विचार करता ही तफावत फार काही मोठी नाही. 

५. विकास दर २०१९ (Growth Rate 2019)

भारत: ५.८% 

पाकिस्तान: ५.७% 

भारत सध्या विकसनशील देश असला, तरी भारताची अर्थव्यवस्था आणि विकास दर पाहता भारत लवकरच विकसित देशांच्या पंक्तीत जाऊन बसेल. तर, दुसरीकडे पाकिस्तानला मात्र परदेशी कर्ज, एफडीआय व फॉरेन रिझर्वचा अभाव व त्या प्रमाणात असलेल्या कमी विकास दरामुळे यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यातही कर्जबाजारीपणाचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे.

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

रेपो रेट म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes आरबीआय वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते. आरबीआय रेपो दरात (Repo Rate) काय बदल करणार याकडे सर्वांचे लक्ष असते. 

Market Cap: मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?

Reading Time: 2 minutes “मार्केट कॅप” हा मार्केट कॅपिटलायझेशन या शब्दाचे लघु रूप आहे. मराठीमध्ये ‘समग्र बाजारमूल्य’ म्हणूनही हा शब्द वापरला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप  १० लाख कोटींपेक्षा जास्त झाल्याचे नुकतेच तुम्ही वाचले असेल. याचाच अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीजने नक्की काय साध्य केले, हे समजण्यासाठी “मार्केट कॅप” म्हणजे काय समजणे आवश्यक आहे.

Insurance : आरोग्य विमा आणि जीवन विमा यातला नेमका फरक काय?

Reading Time: 3 minutes आजकाल बाजारात प्रत्येक गोष्टीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.अगदी कपडे, दागिने,महागड्या वस्तू –…

आरोग्य साक्षरता – जेनेरिक औषधांचे फायदे

Reading Time: 2 minutes आजारी पडल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर तपासून औषधे लिहून देतात. ही औषधे ब्रँड नेम (व्यावसायिक नावाने) परिचित असतात. भारतीय बाजारपेठेत अनेक औषध कंपन्या अस्तित्वात आहेत. या सर्व औषध कंपन्यांनी औषधे कशी बनवावीत यासाठी  Indian pharmacopoeia नावाचे एक पुस्तक आहे. त्यात दिलेल्या पद्धतीनुसारच सर्व कंपन्यांना औषधे बनवावी लागतात. Indian pharmacopoeia मध्ये वेळोवेळी भर पडत असते ती नवनवीन शोधांची व त्यामुळेच तो परिपूर्ण होत असतो.