Reading Time: 2 minutes

 

  • भारतीय शेअर बाजाराने 8 एप्रिल 2024 रोजी नवा विक्रम गाठला. बाजारात नोंदणी झालेल्या भारतीय कंपन्यांचे बाजारमूल्य प्रथमच 400 लाख कोटींवर पोचले. 
  • भारतीय शेअर बाजारात  अगदी अलीकडे निवडणुका आणि जागतिक घडामोडीमुळे मोठी वधघट दिसत असली तर बाजार पडला की गुंतवणूकदार पुन्हा जोमाने खरेदी करतात, असे चित्र गेले काही महिने पाहायला मिळते आहे. गेल्या 9 महिन्यात भारतीय कंपन्यांचे बाजारमूल्य तब्बल 100 लाख कोटी रुपयांनी वाढले, यावरून शेअर बाजारातील घौडदौड लक्षात येते. 
  • गेल्या वर्षभरात आयपीओंना मिळालेला उत्तम प्रतिसाद आणि गुंतवणुकीचे पारंपरिक मार्ग सोडून भारतीय गुंतवणूकदार शेअर बाजारात करत असलेली गुंतवणूक यामुळे शेअर बाजाराची गेल्या वर्षभरातील वाटचाल लक्ष वेधून घेणारी झाली आहे. 8 एप्रिल 2023 रोजी 60 हजारांच्या घरात असलेला सेन्सेक्स एका वर्षात 75 हजारांना गवसणी घालतो आहे. याचा अर्थ तो वर्षात 15 हजार अंशांनी वाढला आहे! 
  • गेल्या वर्षी 5 जुलै रोजी भारतीय बाजाराचे एकूण मूल्य 300 लाख कोटी झाले होते. त्यानंतर त्यात तब्बल 16 टक्के वाढ झाली आहे. (निफ्टी 19,400 वरून 22,623) या तेजीचे वैशिष्ट्य म्हणजे छोट्या आणि मध्यम कंपन्यांच्या बाजारभावात अतिशय वेगाने वाढ होताना पाहायला मिळते आहे. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असून तिचा परिणाम या वाढीत होताना दिसतो आहे. 
  • भारतीय कंपन्यांचे बाजारमूल्य वाढीचा गेल्या काही वर्षातील प्रवास पाहिला तर या तेजीचे महत्व आणखीच अधोरेखित होते. 2007 मध्ये हे बाजारमूल्य 50 लाख कोटी रुपये होते, ते 2014 मध्ये 100 लाख कोटी झाले आणि फेब्रुवारी २०२१ मध्ये ते २०० लाख कोटी रुपये झाले. आणि तेव्हापासून ते दुप्पट झाले आहे! 
  • गेल्या वर्षभरातील तेजीचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे सरकारी कंपन्यांचे वाढलेले बाजारमूल्य. सरकारने सरकारी उद्यागांना बळ दिल्याने त्यातील काही कंपन्यानी  खासगी कंपन्यांपेक्षाही अधिक परतावा दिला आहे. त्याचाच परिणाम म्हणजे निफ्टी पीएसई आणि निफ्टी सीपीएसई या दोन्ही इंडेक्सनी गेल्या वर्षभरात दुप्पट परतावा दिला आहे. विशेष म्हणजे गेले काही वर्षे मागे पडलेल्या सरकारी बँकांनीही 95 टक्के वाढ दिली आहे. याच काळात निफ्टी मायक्रोकॅप 250 इंडेक्सने 93 टक्के, निफ्टी स्मॉलकॅप 100 इंडेक्सने 80 टक्के तर निफ्टी मिडकॅप 1000 इंडेक्सने 66 टक्के वाढ नोंदविली आहे. 
  • कंपन्यांचे तिमाही ताळेबंद जाहीर होण्यास सुरवात झाली असून तेही चांगले असल्याने ही तेजी थांबण्याची शक्यता नाही. अर्थात निवडणूक निकालापर्यंत त्यात मोठे चढउतार पाहण्यास मिळतील. अमेरिकेतील अर्थव्यवस्था कशी आहे, याचे भारतासह सर्व जगातील शेअर बाजारावर परिणाम होतात, मात्र गेले काही महिने तो भारतीय अर्थव्यवस्थेवरच अधिक अवलंबून असल्याचे दिसून येते आहे. 
  • भारतीय शेअर बाजारात सर्वसामान्य भारतीय गुंतवणूकदारांची गुंतवणूक वेगाने वाढत चालली असून त्याचाही हा परिणाम म्हणावा लागेल. 2019 च्या मार्चमध्ये तीन कोटी 60 लाख भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करत होते, त्यांची संख्या मार्च 2024 मध्ये 15 कोटींवर गेली आहे.
  • बाजारातील तेजी आणखी काही कारणांनी सुदृढ मानली जात आहे, ती म्हणजे गेल्या पाच वर्षात भारतीय गुंतवणूकदारांनी विक्रमी 92.7 अब्ज डॉलरची गुंतवणूक केल्याने परदेशी गुंतवणूकदारांनी बाहेर पडूनही बाजारावर आता त्याचा मोठा परिणाम होत नाही. दुसरे म्हणजे याच पाच वर्षांत भारतीय कंपन्यानी आयपीओद्वारे 92.9 अब्ज डॉलर इतके विक्रमी भांडवल उभे केले आहे. 
  • विशेष म्हणजे यातील अनेक आयपीओनी गुंतवणूकदारांना अनेक पटीनी परतावा देऊन मालामाल केले आहे. गेल्या काही वर्षात भारतात वेगाने झालेल्या डीजीटलायझेशनचाही या वाटचालीत मोठा वाटा आहे. 
  • गेल्या वर्षभरातील तेजीत लार्ज कॅप कंपन्याचा वाटा कमी असल्याने यापुढील काळात त्यांच्यामधील गुंतवणूक वाढविण्याचा सल्ला सध्या तज्ञ देत आहेत.

लेखक – यमाजी मालकर

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मृत्युपत्र – मृत्युपत्र म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे?

Reading Time: 4 minutes मृत्युपत्र हा एक महत्वाचा पण बहुतांश वेळा गांभीर्याने घेतला न जाणारा विषय आहे. मृत्युपत्र हे बंधन अथवा जबाबदारी नसून तो आपला हक्क आहे. त्यामुळे या हक्काबद्दल जागरूक व्हा. मृत्युपत्र तयार केल्यामुळे तुमच्या मालमत्तेचं व कुटुंबाचं भविष्य सुरक्षित राहील. तसेच, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र बांधून ठेवण्याची ताकदही मृत्युपत्रामध्ये आहे.  

मर्यादित भागीदारी संस्था: नियम व वैशिष्ट्ये

Reading Time: 3 minutes व्यवसायाचे कर्ज व देणी वसूल करण्यासाठी भागीदाराच्या वैयक्तिक मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता असते. मर्यादित भागीदारी व्यवसायामुळे हे प्रश्न सुटू शकतात. डॉक्टर्स, सनदी लेखापाल, वास्तुविशारद, वकील, तांत्रिक सल्लागार, कर सल्लागार, वित्तीय सल्लागार यांना आपल्या ज्ञानाचा आणि सहकाऱ्याच्या ज्ञानाचा उपयोग करून मर्यादित भागीदारीमुळे (LLP) आपला व्यवसाय वाढवता येऊ शकेल. अशा प्रकारे मर्यादित भागीदारी असलेली भागीदारी स्थापन करता येणे सोपे आणि कमी खर्चाचे आहे.

लाभांश (Dividend) म्हणजे काय?

Reading Time: 3 minutes कंपनीने आपल्या करोत्तर नफ्यातून (Profit after taxes)  समभागधारकांना पैशाच्या स्वरूपात दिलेली भेट म्हणजे ‘लाभांश’ (Dividend) होय. कंपनी झालेला संपूर्ण फायदा वाटून टाकत नाही तर त्यातील काही भाग भागधारकांना देते. शिल्लक रक्कम भविष्यातील विस्तार योजना किंवा अधिक व्याजदराने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरून आपली नफाक्षमता वाढवते.

सर्व नोटा परत आल्या तरी नोटबंदी यशस्वीच का आहे?

Reading Time: 3 minutes सरकारने रद्द केलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या १०० टक्के नोटा परत आल्या तरी नोटबंदी यशस्वी झाली, कारण त्यावर आता कर भरला गेला आणि आता ती एका जागी पडलेली रक्कम बँकेत येवून प्रवाही झाली. नोटबंदीपूर्वीची वाढ ही “रोगट सूज” होती, ती जाऊन देश सशक्त होतो आहे आणि दमदार वाटचालीला सज्ज होतो आहे, हे आता अधिक महत्वाचे !