Economic Changes
Reading Time: 3 minutes

Economic Changes

कोरोनाच्या साथीत जे अनेक बदल होत आहेत, त्यात आर्थिक बदलांचाही (Economic Changes) समावेश आहे. अशा बदलांत आरोग्य विमा काढणे, डीजीटलायशेनचा स्वीकार करणे आणि म्युच्युअल फंडासारखे गुंतवणुकीचे नवे मार्ग चोखाळणे, या तीन पावलांना अतिशय महत्व आहे. ही तीन पाऊले लवकरात लवकर उचलण्याची हीच वेळ आहे. 

कोरोनासारख्या अभूतपूर्व साथीने आपल्या आयुष्यात आमुलाग्र बदल केले असून ही साथ जोपर्यंत पूर्णपणे जात नाही, तोपर्यंत अनेक बदल अपेक्षित आहेत. आपण येथे आर्थिक सुरक्षिततेचा विचार करता सध्या कोणते बदल आपल्या आजूबाजूला होत आहेत, याचा विचार करणार आहोत. कोरोना साथीने सर्व जगाचे आर्थिक नुकसान केले असून त्याला भारत अपवाद असण्याचे कारण नाही. भारताचे नुकसान म्हणजे भारतातील नागरिकांचे नुकसान. ज्यांना कोरोनाची लागण झाली, त्यांना उपचारांवर मोठा खर्च करावा लागला, ज्यामुळे त्यांना त्यांची आर्थिक पुंजी तर खर्च करावीच लागली, पण त्यांच्या भविष्यातील आर्थिक विवंचनाही वाढल्या.  

हे नक्की वाचा: नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन 

Economic Changes: तीन महत्वाची पाऊले

पहिले पाऊल आरोग्य विमा –

  • भविष्यातील आर्थिक समस्या कमी करण्यासाठी काही जागरूक नागरिकांनी पावले उचलण्यास सुरवात केली आहे. त्यातील सर्वात महत्वाचे पाऊल म्हणजे आरोग्य विमा काढणे होय. 
  • याकाळात ज्यांच्याकडे आरोग्य विमा होता, ते नागरिक आर्थिक फटका बसण्यापासून वाचले आहेत, हे लक्षात आल्याने अनेक जण आता आरोग्य विमा काढत आहेत. 
  • आरोग्य विमा ही आर्थिक नियोजनात सर्वात आधी करण्याची गोष्ट आहे. पण तिला उशीर झाला असल्यास त्याचा विचार करत बसण्यापेक्षा शक्य तितक्या लवकर कुटुंबाचा आरोग्य विमा काढणे, अतिशय महत्वाचे आहे. 
  • सरकारी कंपन्यांसह अनेक कंपन्या या क्षेत्रात असून त्यांच्यावर सरकारी यंत्रणांचे नियंत्रण असल्याने कोणत्याही कंपन्यांना विमा काढण्यास हरकत नाही. 
  • या विम्याची रक्कम वर्षातून एकदा भरावी लागते. त्यातून आपल्याला परत काही मिळत नसले तरी आजारपणात येणाऱ्या मोठ्या खर्चाची जोखीम कमी होते, हे लक्षात ठेवले पाहिजे. 
  • विमा आहे म्हणून आपल्याला दरवर्षी काहीतरी मिळाले पाहिजे, या विचारातून बाहेर पडून दरवर्षी आरोग्य विम्याचा हप्ता भरला पाहिजे. त्याला मिळणारी इन्कम टॅक्समधील सूट हा किरकोळ मुद्दा आहे. 
  • आपण किती लाखाचा विमा घेतो आणि त्यात कोणकोणत्या आजाराची जोखीम विम्यातून कमी करतो, यावर वर्षाला किती रक्कम भरायची हे अवलंबून असते. 
  • शिवाय जेव्हा आपण निरोगी आहोत, तोपर्यंत तो कमी रकमेत मिळतो, हेही लक्षात ठेवले पाहिजे. तात्पर्य, अजून आरोग्य विमा काढला नसल्यास तो काढून घेतला पाहिजे. 

विशेष लेख: देशाने स्वीकारलेल्या बदलांत आपण नेमके कोठे आहोत? 

दुसरे पाऊल डीजीटलायशेनचा स्वीकार –

  • दुसरी महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे डीजीटलायशेन वेगाने वाढत चालले आहे. त्याविषयीच्या मनातील शंकाकुशंका आता बाजूला ठेवून त्याचा फायदा घेण्यास सुरवात केली पाहिजे. 
  • आत्तापर्यंत अनेक आर्थिक व्यवहार करण्यासाठी आर्थिक संस्थांच्या पायऱ्या अनेकवेळा चढाव्या लागत होत्या, पण आपला व्यवसाय कमी होऊ नये आणि ग्राहकांचीही सोय व्हावी म्हणून अशा सर्व संस्थांनी डीजीटलायशेनला वेग दिला आहे. त्यामुळे अगदी घरी बसून केवासी पूर्ण करणे, जवळपास सर्व आर्थिक व्यवहार करणे, हे शक्य झाले आहे. त्यामुळे आपले महत्वाचे आर्थिक निर्णय लांबणीवर टाकण्यापेक्षा ते डिजिटल पद्धतीने पूर्ण करण्यास सुरवात केली पाहिजे. 
  • अशा आर्थिक व्यवहारांचे पासवर्ड सांभाळणे आणि आर्थिक व्यवहार सुरक्षित करणे, ही घराची किंवा गाडीची किल्ली सांभाळण्यासारखीच गोष्ट आहे, हे एकदा मान्य केले की ते एकत्र लिहून आपल्या घरात ठेवले पाहिजेत, ही विशेष त्रासाची बाब रहात नाही. 
  • डिजिटल व्यवहार अधिकाधिक सुरक्षित व्हावेत यासाठी सरकार आणि संबंधित संस्था प्रयत्न करत आहेतच. उदा. इतके दिवस एटीममध्ये कार्ड वापरून पैसे काढता येत होते, पण आता काही ठिकाणी कार्ड वापरल्यावर फोनवर ओटीपी येतो आणि तो टाकल्याशिवाय पैसे मिळत नाही. म्हणजे ज्या फोनची नोंद बँकेत आहे, तो फोन असल्याशिवाय पैसे मिळत नाही. एटीम संबंधीची फसवणूक यामुळे टळणार आहे. 

महत्वाचा लेख: नव्या गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड योग्य पर्याय आहे का ? 

तिसरे पाऊल गुंतवणूक –

  • तिसरा तेवढाच महत्वाचा मुद्दा म्हणजे भविष्यकाळासाठीची आर्थिक तरतूद. त्याची गरज पुढील काळात अधिकच वाढणार असून तिची तरतूद अनेक जागरूक नागरिक करताना दिसत आहेत.
  • घरी बसून शेअर बाजारातून कमाई करणारा एक मोठा वर्ग या काळात तयार झाला आहे. 
  • शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या गेल्या दीड वर्षांत एका कोटीने वाढली आहे. आपल्या देशाची लोकसंख्या लक्षात घेता ही फार मोठी संख्या नसली तरी कमी काळात एवढे अधिक नवे नागरिक आतापर्यत शेअर बाजारात आले नव्हते. 
  • अर्थात, आर्थिक साक्षरता पुरेशी नसल्याने आणि गुंतवणुकीयोग्य रक्कम नसल्याने अजूनही अनेक नागरिक शेअर बाजारातील गुंतवणुकीपासून दूरच आहेत. पण असेही काही नागरिक आहेत, जे शेअर बाजाराच्या गुंतवणुकीचा चांगला फायदा घेत आहेत. तो मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड होय.
  • देशाची आर्थिक स्थिती खालावली, असे साधारण चित्र असताना शेअर बाजार मात्र पूर्वीसारखाच आशावाद दाखवितो आहे. त्यामुळेच तो गेल्या एक वर्षात दुपटीने वाढला आहे. याचा फायदा म्युच्युअल फंडाच्या मार्गाने घेतला जाऊ शकतो, हे ज्यांच्या लक्षात आले, त्यांनी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीवर भर दिला आहे. त्यामुळेच म्युच्युअल फंड उद्योगाची मालमत्ता गेल्या एप्रिलमध्ये तब्बल ३२.४ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. 
  • ३२ लाख कोटी रुपये म्हणजे भारत सरकारच्या वार्षिक अर्थसंकल्पापेक्षाही अधिक! म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात चांगला मार्ग समजला जातो, तो म्हणजे एसआयपी म्हणजे सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. याचा अर्थ आपल्या मासिक कमाईतून विशीष्ट रक्कम चांगल्या म्युच्युअल फंडात दर महिन्याला जमा करणे. असे सध्या साडे आठ हजार कोटी रुपये भारतीय गुंतवणूकदार दर महिन्याला जमा करत आहेत! (एकादा बँकेत फॉर्म भरून दिला की, ते परस्पर होते. आतातर त्यासाठी बँकेत जाण्याचीही गरज राहिलेली नाही.) 
  • या मार्गाने शेअर बाजारातील चढउताराचा फायदा म्युच्युअल फंड कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना करून देतात. या मार्गाने १० पासून ५० टक्के परतावा देणारे म्युच्युअल फंड आहेत. 
  • कोणत्या म्युच्युअल फंडात एसआयपी करावी आणि त्याचे व्यवस्थापन कसे करावे, यासाठी या क्षेत्राची चांगली माहिती असलेला मित्र किंवा सल्लागार मात्र मिळविला पाहिजे. गुंतवणुकीचे पारंपरिक मार्ग बाजूला पडत असून नवे मार्ग जग स्वीकारताना दिसत आहे. त्यात आपण आपल्या परीने भाग घेतला पाहिजे. 

यमाजी मालकर 

[email protected]

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: Economic Changes Marathi Mahiti, Economic Changes in Marathi, Economic Changes Marathi Mahiti, Economic Changes

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

“झूम ॲप” संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 2 minutes कोविड-१९ कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. अनेक उद्योग- व्यवसाय बंद आहेत. शक्य ते व्यवसाय घरून ऑनलाईन पद्धतीने केले जात आहेत. नोकरदार वर्गालाही घरून ऑनलाईन काम करावे लागत आहे (Work From Home). याच वर्क फ्रॉम होम मध्ये सर्वांत जास्त गाजलेले मोबाईल ॲप आणि सॉफ्टवेअर म्हणजे ‘झूम ॲप. झूमचा वापर करून मिटींग कशी घ्यायची? झूम सायबर सुरक्षेच्या दृष्टीने नापास का ठरते ? याबद्दल सविस्तर माहिती घेऊया –

आर्थिक आणीबाणी म्हणजे काय? 

Reading Time: 3 minutes आर्थिक आणीबाणी यावर सध्या प्रसार माध्यमातून विविध बातम्या येत आहेत. प्रत्यक्षात ही तरतूद आर्थिक (Economic) संबंधात नसून वित्तीय (Financial) संबंधात आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी एक जनहित याचिकाही प्रलंबीत आहे. भारतीय राज्यघटनेत असलेल्या विविध  तरतुदींनुसार कलम ३५२, ३५६ आणि ३६० यानुसार भारताच्या राष्ट्रपतींना आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार आहे.

नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक

Reading Time: 3 minutes कोविड-१९ मुळे सध्या सर्व कामकाज ठप्प आहे, अनेक लोक आपापल्या घरी गेल्याने, तसेच त्यातील काही पुन्हा न येण्याच्या शक्यतेने, तात्पुरत्या कंत्राटी / कायम स्वरुपात अनेक रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक होण्याच्या प्रकारातही वाढ होण्याची शक्यता आहे. त्याविषयी संस्थेच्या कार्यकर्तीला आलेल्या अनुभवातून काळजी कशी घ्यावी व फसलो तर काय करावे याविषयी थोडे मार्गदर्शन. 

कोरोना व्हायरसचे पृथ्वीवर झालेले परिणाम

Reading Time: 3 minutes कोरोना व्हायरस हा जीवघेणा विषाणू चीनच्या वुहान शहरापासून जगभरात पसरला. हवाई मार्गाने येऊन याने भारतातही पाय पसरले. संपूर्ण पृथ्वीवर या रोगाने थैमान मांडले आहे. याला रोखण्यासाठी शास्त्रज्ञ, संशोधक त्यांचे प्रयत्न करत आहेतच, पण अद्याप यावर योग्य इलाज मिळाला नाही. कोरोनाचे गंभीर परिणाम पृथ्वीवर प्रत्येक सजीव जातीवर दिसून येत आहे. या महामारीचा पृथ्वीवर व सजीवांवर काय परिणाम होत आहे, ते आपण जाणून घेऊ.