यशस्वी गुंतवणूकदाराची वैशिष्ट्ये- भाग १

Reading Time: 2 minutes जेव्हा कधी गुंतवणूक, पैसे, संपत्ती, मालमत्ता वगैरे विषय निघतात साहजिकच आपल्या डोळ्यांसमोर वॉरन बफेट, राकेश झुनझुनवाला वगैरे गुंतवणूकदारांची नावे येतात. या लोकांनी यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी काय केलं? त्यांच्याकडे नक्की काय अशी गुरुकिल्ली होती की ज्याने ही संपत्तीची दारं उघडली असं एक कुतूहल असतंच. तर या आणि पुढच्या लेखात आपण अशाच काही आर्थिक यशाच्या गुरुकिल्ल्यांचा उहापोह करणार आहोत. 

Rakesh Jhunjhunwala: राकेश झुनझुनवाला – भारतीय शेअर बाजारातील बादशाह

Reading Time: 3 minutes घरात मित्रांबरोबर शेअर्स, स्टॉक मार्केट बद्दलच्या गप्पा लहान मुलाच्या कानावर पडतात आणि तो मुलगा आपल्या वडिलांना विचारतो की शेअर्सच्या किमती का बदलतात, त्याच्यावर त्याचे वडील त्याला उत्तर द्यायचे न टाळता सांगतात की, “जा, वर्तमानपत्रामध्ये ग्वालियर-रेयॉन बद्दल काही बातमी आली आहे का बघ आणि असेल तर त्याच्या शेअर्सची किंमत नक्कीच बदलणार!” या एका वाक्यावरून त्या मुलामध्ये शेअर मार्केटबद्दल उत्सुकता निर्माण होते आणि एक दिवस तो याच शेअर मार्केटचा राजा बनतो.अगदी फिल्मी वाटणारी ही खरी गोष्ट आहे, एका सर्वसामान्य भारतीय कुटुंबातील राकेश झुनझुनवाला यांची.

अमेरिका-चीनमधील तणावाचे बाजारावरील परिणाम

Reading Time: 2 minutes अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवण्यासाठी चीनने ही महामारी पद्धतशीरपणे रुजवल्याचे पुरावे असल्याचे अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट यांनी स्पष्ट केले. अमेरिका आणि चीन या जगातील दोन सर्वात मोठ्या आर्थिक शक्तींमध्ये तणावातून युद्ध भडकले असताना सोमवारी स्पॉट गोल्डच्या किंमतीत ०.१४ टक्क्यांनी वाढ झाली. आजच्या लेखात आपण अमेरिका-चीनमधील तणावाचे शेअर बाजारावर झालेल्या परिणामांची माहिती घेऊया.

फार्मा क्षेत्राने दिला गुंतवणूकदारांना दिलासा

Reading Time: 2 minutes लॉकडाऊनमध्ये झालेली वाढ आणि नजीकच्या काळात डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या व्यापार युद्धाचे दिलेले संकेत याचा परिणाम संपूर्ण आशियाई बाजारपेठेवर सोमवारी दिसून आला. फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रातून गुंतवणूकदारांना दिलास मिळाला आहे.

शेअर बाजार- आयटी क्षेत्र जोमात तर बँकिंग, वाहन आणि ऊर्जा क्षेत्राला फटका

Reading Time: 2 minutes भारतीय शेअरबाजारात मागील आठवड्याची सुरुवात एका रोमांचक ट्रेंडिंग डे ने झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींमध्ये अस्थैर्य दिसून आले. संपूर्ण सत्रात चढ-उतार पहायला मिळाला. सोमवारी ट्रेंडिंगचा परिणाम असा झाला की, दोन्ही बाजार पुन्हा आपापल्या स्थानी पोहोचले. अखेर सेन्सेक्स ३१,६४८ अंकांवर थांबला तर निफ्टी फ्लॅट होऊन ९,२६१ अंकांवर बंद झाला.

गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडावरील प्रगल्भ विश्वास

Reading Time: 3 minutes मार्च महिन्यातल्या कोरोनाच्या आघाताने शेअर बाजार अगदी ३५% कोसळला तरी ही मार्च २०२० मधील समभाग योजनांमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढत राहिला. विशेष म्हणजे मार्च महिन्यातील शेवटचे ९ दिवस टाळेबंदी मध्ये गेल्यानंतर ही हा गुंतवणुकीचा ओघ, त्यांचा म्युच्युअल फंड वरील प्रगल्भ विश्वास दर्शवितो. गुंतवणूकदारांनी मार्च महिन्यातील शेवटच्या ९ दिवसात ऑनलाईन गुंतवणूक पद्धती अवलंबून पडत्या बाजारात जास्त युनिट्स मिळवण्यासाठी समभाग योजनांमध्ये गुंतवणूक केली. 

वेबिनार – “पडत्या शेअर बाजारात SIP बंद करावी का?”

Reading Time: < 1 minute मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११ वा.  Join Zoom Meeting https://us02web.zoom.us/j/89865210901?pwd=TZ-IGeNfmzc Meeting ID: 898 6521 0901 Password: 444444

बाजारातील अस्थिरता व जेष्ठ नागरिक

Reading Time: 4 minutes गेले काही दिवस भांडवल बाजारात अस्थिरता आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक आपल्या ४२,२७४ वरून २५,६३९ तर, राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी हा निर्देशांक १२,४३० वरून ७,५११ पर्यंत तळ गाठून आला. जवळपास ४०% घट ही एकदम अत्यल्प कालावधीत झाली. यापूर्वीही अनेकदा ही वेळ आली आहे त्यातून बाजार सावरला आणि त्यांने पुन्हा उभारी घेतली. यातील सन २००८ मधील मंदीमध्ये निर्देशांकात ६०% घट झाली होती. देशी आणि परदेशी वित्तसंस्थाचा कल बाजारास हेलकावे देत असतो. त्यांना आपल्या गुंतवणुकीवर फक्त नफाच मिळवायचा असल्याने उपलब्ध सर्व मार्गांचा  वापर त्यांच्याकडून केला जातो. 

कोरोना – अस्थिर शेअर बाजारात आपली एस.आय.पी सशक्त कशी कराल?

Reading Time: 3 minutes एस.आय.पी मार्फत गुंतवणूक केल्यास आपण जोखीम कमी करू शकतो. मात्र त्या जोडीला चांगला परतावा मिळविण्यासाठी आणखी काय करता येईल ते आपण पाहू. एस.आय.पी मार्फत म्युच्युअल फंडात जोडल्या गेलेल्या नवनवीन गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडाबद्दल विश्वास आणखी कसा वाढेल, हा या लेखामागचा उद्देश. 

मानवजातीला केवळ अस्तित्वाच्या पातळीवर आणणारे संकट ! 

Reading Time: 3 minutes कोरोना विषाणू चीनमध्ये कसा उत्पन्न झाला, तो जगात आणखी किती जणांचे बळी घेणार, त्यामुळे जगाची अर्थव्यवस्था उध्वस्त होणार का, या साथीतून जगाची सुटका कशी होणार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे घनतेचा (दर चौरस किलोमीटरला ४२५ माणसे) विचार करता जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारताचे या संकटात काय होणार, या चिंता सध्या प्रत्येकाला सतावत आहेत. मानवजातीला या अभूतपूर्व चिंतेतून दूर करण्यासाठी आणि जगाची चाके पुन्हा फिरण्यासाठी माणूस प्रयत्नशील आहे आणि त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवून आपला नजीकच्या काही दिवसांचा दिनक्रम ठरविणे, एवढेच आज आपल्या हातात आहे.