Investment Rules
Reading Time: 3 minutes

Investment Rules

योग्य गुंतवणूक पर्याय निवडणे आणि गुंतवणुकीची योजना तयार केल्याने जास्तीत जास्त परतावा मिळवता येतो. सुयोग्य गुंतवणुकीसाठी वापरले जाणारे अनेक महत्त्वाचे नियम आहेत. या नियमांमुळे गुंतवणुकीत मोठी मदत होऊ शकते. अर्थात केवळ त्यांच्यावर अवलंबून गुंतवणूक करायची किंवा नाही हे ठरवणं शक्य नाही. गुंतवणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे अपेक्षित व्याजदर. कोणतीही गुंतवणूक तुम्हाला भविष्यातील व्याजदराची शंभर टक्के हमी देऊ शकत नाही. मात्र, या प्रमुख नियमांमुळे तुम्हाला मार्गदर्शन नक्की  मिळू शकते. 

हे नक्की वाचा: स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताय? लक्षात ठेवा या ५ गोष्टी

Investment Rules: गुंतवणुकीचे ७ नियम

१. ७२ चा नियम: 

  • आपला पैसा दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील, हे ७२ चा नियम ठरवतो. समजा तुम्ही १,००,००० रुपये गुंतवले आणि वार्षिक १०% परताव्याची अपेक्षा केली. मग तो पैसा किती वर्षांत दुप्पट होईल? 
  • या नियमानुसार, परताव्याच्या अपेक्षित व्याजदराने ७२ ला भाग दिला तर, त्याचे आलेले उत्तर म्हणजे तुमचा पैसा दुप्पट होण्यासाठी लागणारी वर्षे, म्हणून, दुप्पट होण्याचा कालावधी = ७२/ परताव्याचा दर. 
  • या उदाहरणात, परताव्याचा अपेक्षित दर १०% प्रति वर्ष आहे, म्हणून, दुप्पट होण्याचा कालावधी = ७२/१० =७.२ वर्षे, म्हणून ७.२ वर्षांत तुमची गुंतवणूक दुप्पट होईल, अशी अपेक्षा तुम्ही करू शकता. 
  • एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी की, जी गुंतवणूक चक्रवाढ व्याज देते, त्याच प्रकारासाठी हा नियम लागू होतो.

२. ११४ चा नियम: 

  • ७२ च्या नियमासारखेच तत्त्व वापरून आपली गुंतवणूक किती वर्षात तिप्पट करायची हे ठरवण्यासाठी ११४ चा नियम वापरता येईल. 
  • या नियमानुसार, आपण अपेक्षित परताव्याच्या दराने ११४ ला भाग दिला तर पैसा तिप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील, याचा अचूक अंदाज मिळवता येतो.
  • तिपटीचा कालावधी = ११४/परताव्याचा दर आपण १००,००० रुपये १०% प्रति वर्ष या अपेक्षित दराने गुंतवले तर, तिपटीचा कालावधी = ११४/१० =११.४ वर्षे. 

३. १४४ चा नियम: 

  • ७२ आणि ११४ च्या नियमाप्रमाणेच, तुम्हाला तुमची गुंतवणूक किती वर्षांत चौपट हवी आहे, हे ठरवायचे असल्यास, तुम्ही १४४ चा नियम वापरू शकता. 
  • या नियमाप्रमाणे, अपेक्षित परताव्याच्या दराने तुम्ही १४४ ला भाग दिला तर तुम्हाला तुमचा पैसा चौपट करण्यासाठी किती वर्षे लागतील, याचा अचूक अंदाज येईल. म्हणून, चौपटीचा कालावधी = १४४/परताव्याचा दर तुम्ही प्रति वर्ष १०% दराने परताव्याच्या अपेक्षेने १,००,००० रुपये गुंतवले तर, चौपटीचा कालावधी = १४४/१० =१४.४ वर्षे.म्हणजे, १४.४ वर्षांमध्ये तुमची गुंतवणूक तिप्पट होईल, अशी अपेक्षा ठेवू शकता. 
  • याठिकाणी हे महत्त्वाचे आहे की, चक्रवाढ व्याज देणाऱ्या गुंतवणुकीसाठीच हा नियम लागू होतो.

महत्वाचा लेख: म्युच्युअल फंड युनिट गुंतवणूक काढून घेताय? थांबा, आधी हे वाचा…

४. किमान १०% गुंवतणुकीचा नियम: 

  • आपण पैसा कमवायला सुरुवात करतो तेव्हा बचत आणि गुंतवणूक ही सहसा लक्षात येण्यासारखी गोष्ट नाही. 
  • तथापि, तुम्हाला चक्रवाढ व्याजदराचा लाभ घ्यायचा असेल, तर गुंतवणुकीस लवकर सुरुवात महत्त्वाची आहे. 
  • गुंतवणुकीच्या नियमाप्रमाणे, सध्याच्या पगाराच्या किमान १०% गुंतवणूक केली पाहिजे आणि दरवर्षी त्यात १० टक्क्यांची वाढ केली पाहिजे.

५. १०० वजा वयाचा नियम:

  • ‘१०० मायनस एज रुल’, हा इक्विटी आणि कर्ज यांमधील विवरणाचा अंदाज येण्यासाठी मदत करू शकतो. 
  • या नियमाप्रमाणे, तुम्हाला १०० मधून तुमचे वय वजा करावे लागते. येणारे उत्तर हे तुम्हाला लागू होणारे इक्विटी एक्सपोजरची टक्केवारी असते. उर्वरीत रक्कम कर्जात गुंतवू शकता. 
  • निवृत्तीचे वय आल्यावर इक्विटीचे एक्सपोजर कमी झाले पाहिजे, या समजानुसारच हा नियम काम करतो.

६. आपत्कालीन निधीचा नियम: 

  • आयुष्य अनिश्चित आहे. आर्थिक संकटांसाठी तुम्ही नेहमी सज्ज असले पाहिजे. म्हणून, बहुतांश आर्थिक तज्ज्ञ तरुण गुंतवणुकदारांना गुंतवणूक सुरु करण्यापूर्वी आपत्कालीन निधी बाजूला ठेवण्याचा सल्ला देतात. 
  • या नियमाप्रमाणे, तुम्हाला किमान ३ ते ६ महिने पुरेल एवढा मासिक खर्च भागेल एवढा निधी बाजूला ठेवला पाहिजे. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत पैशांची निकड असताना याचा उपयोग होईल. 
  • हा आपत्कालीन निधी तरल असला पाहिजे तसेच संकटकाळात सहजपणे मिळवता आला पाहिजे.

विशेष लेख: बचत आणि गुंतवणुकीचे ५ मूलभूत नियम

७. ४% पैसे काढण्याचा नियम: 

  • गुंतवणुकीच्या नियमापेक्षा हा नियम अधिक आर्थिक शिस्त लावणारा आहे. हा अत्यंत महत्वाचा आहे. 
  • बहुतांश लोक त्यांच्या निवृत्तीसाठी बचत करण्याचा प्रयत्न करतात, स्वत:चे आर्थिक स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी बचत करतात. मात्र, महागाईचा दर अनिश्चित असल्याने, अकालीच हा निधी वाया जाण्याचा धोका आहे. 
  • ४% पैसे काढण्याचा नियम हा विशेषत: निवृत्तीधारकांसाठीच आहे. जेणेकरून त्यांची बचत खर्च न होता एक निरंतर उत्पन्नाचा स्रोत सुरू राहिल.
  • या नियमाप्रमाणे, तुम्ही प्रत्येक वर्षी तुमच्या निवृत्तीच्या संचयाच्या ४% पैसे काढले तर तुमचा दैनंदिन खर्च व्यवस्थापित करता येईल. 
  • तुमचा निवृत्तीचा बचत निधी १ कोटी रुपये असेल, तर तुमचा दैनंदिन खर्च व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही दरवर्षी ४ लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे काढू नयेत.

गुंतवणुकीसाठीचे हे नियम कोणत्याही गुंतवणूकदारासाठी मार्गदर्शक ठरू शकतात. यासंदर्भात महत्त्वाची सूचना म्हणजे, हे नियम अंधपणाने पाळू नका. विचार आणि अभ्यासपूर्ण निर्णय ही यशस्वी गुंतवणूकदाराची ओळख आहे. गुंतवणूक सुरु करण्यापूर्वी आपण आपल्या परीने पर्यायांचा शोध घेऊन गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा केली पाहिजे. लक्षात ठेवा, गुंतवणुकीचा उत्तम पोर्टफोलिओ हा आपली जोखिमीची क्षमता लक्षात घेऊन तयार करणे आवश्यक आहे. 

– श्री हर्ष जैन

सह-संस्थापक आणि सीओओ 

Groww.in

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: Investment Rules in Marathi, Investment Rules Marathi, Investment Rules Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

नोटाबंदीपासून ठप्प नागपूरातील लाकूड व्यापाराच्या संकटात भर

Reading Time: < 1 minute लाकडावर १८ टक्के वस्तू व सेवा कर लावण्यात आला असला तरी सरकारने…

सोने खरेदीविक्रीवर पॅनकार्ड अनिवार्य

Reading Time: < 1 minute सद्य परिस्थितीत दोन लाख रुपयांच्यावरील सोने खरेदीसाठी पॅनकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.…

जागतिक बचत दिन – जगा सन्मानाने…

Reading Time: 2 minutes आज ३० ऑकटोबर! भारतमध्ये आजचा दिवस ‘जागतिक बचत दिन’ (world saving day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस ३१ ऑक्टोबर १९२४ रोजी मिलानो, इटली येथील पहिल्या ‘आंतरराष्ट्रीय कॉंग्रेस बचत बँक (बचत बँकांच्या जागतिक सोसायटी)’ दरम्यान स्थापित करण्यात आला. इटालियन प्राध्यापक ‘फिलिपो रॅव्हिझाने’ हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय बचत दिन’ म्हणून जाहीर केला. जगभर, ‘जागतिक बचत दिन’ दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. भारतामध्येही पूर्वी हा दिवस ३१ ऑक्टोबरलाच साजरा होत असे. परंतु १९८४ साली दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे ३१ ऑक्टोबरला निधन झाल्यामुळे त्यानंतर भारतामध्ये ‘जागतिक बचत दिन’ हा ३० ऑक्टोबरला साजरा केला जातो.

एशियन पेंट्स – भारतीय मल्टी नॅशनल कंपनी !

Reading Time: 3 minutes १९४२ च्या दुसऱ्या महायुद्धात भारतात पेन्ट्सची आयात करण्यावर बंदी घालण्यात आली होती.…